ग्राम
पातळीवरील प्रशासन हे आजच्या परिस्थितीत सर्वात महत्वाचे झाले
आहे. शासनामार्फत ग्रामस्थांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या
जातात परंतु ब-याच योजनांचा लाभ प्रत्यक्ष ग्रामस्थांपर्यंत ब-याचवेळा
पोहोचत नाही असे चित्र दिसते. गाव पातळीवर महसूल विभागाचा प्रतिनिधी
तलाठी, ग्राम विकास विभागाचा प्रतिनिधी ग्रामसेवक तसेच शासनाच्या
विविध खात्याचे ग्रामस्तरीय अधिकारी / कर्मचारी कार्यरत असतात.त्यांना
ग्रामीण जीवनाची तसेच त्यासंबंधीच्या प्रश्नांची / समस्यांची
/ चांगली
जाण असते. वर नमुद
केल्याप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्या त्या शासकीय
प्रतिनिधीमार्फत सामान्यतल्या सामान्य घटकापर्यंत प्रभावीरित्या
पोहचविण्यात येणा-या अडचणी / समस्यांची सोडवणूक तिथल्या तिथे
होवू शकते व तसेच ते होणे आवश्यकही आहे. परंतु तसे होतांना
दिसत नाही. तसे न होण्याच्या अनेकविध कारणांपैकी वर नमुद केलेल्या
विविध ग्रामपातळीवरील
शासकीय / अधिकारी कर्मचा-यांमधील समन्वयाचा अभाव हे एक प्रमुख
कारण दिसून येते.त्यामुळे त्यांचा परस्पर समन्वय घडून आणणे हे
ग्रामस्तरावरील
समस्या / अडचणी सोडविण्याचे दृष्टीकोनातून उचललेले महत्वाचे पाऊल
ठरेल.
ग्रामस्थांना
येणा-या अडचणी
गावपातळीवरील
ग्रामस्थांच्या प्रश्नात गावक-यांना 7/12 उतारा लवकर न मिळणे
/ जमीन विषयक नोंदी लवकर न होणे, ग्रामपातळीवरील अभिलेख जसे
जन्म-मुत्यु दाखला, विविध अर्ज ग्रामस्थांना सहज उपलब्ध न होणे,
गावातील स्वस्तधान्य दुकानात केरोसिन व धान्य न मिळणे किंवा
ते शासकीय किंमतीत न मिळणे, शाळेत शिक्षकांची अनुपस्थिती, शालेय
पोषण आहार / अंगणवाडी आहार न मिळणे, प्राथमिक आरोग्य केंद्र
/ उपकेंद्रांवर आरोग्य अधिकारी / कर्मचारी हजर नसणे / औषधे
उपलब्ध नसणे, वीज चोरी होणे, कृषी विषयक माहिती ग्रामस्थांना
न मिळणे, पिक पहाणी योग्य पध्दतीने न होणे, ग्रामस्तरावरील
विविध योजनांची माहिती न मिळणे हे व अशा सारखे अनेक प्रश्न
लाभार्थींना, ग्रामस्थांना भेडसावत असतात. त्यामुळे गांव स्तरावरील
विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांपर्यंत
पोहोचते किंवा कसे हे गाव पातळीवरीच पाहून त्याचा नियमितपणे
आढावा घेणे अत्यावश्यक आहे.
ग्रामस्थ
दिन कशासाठी ?
लोकांपर्यंत
जाण्यामध्ये शासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडते व यातून जनतेची
कामे रखडली जातात अशी लोकांची सर्वसाधारणपणे प्रतिक्रिया जाणवते.
प्रतिसादात्मक प्रशासन ही सध्याच्या काळाची गरज आहे. कारण समाज
हा नेहमीच परिवर्तनशील असतो. बदलत्या परिस्थितीची आव्हाने पेलण्यासाठी
प्रशासनालाही गतीमान व परिवर्तनशील बनणे
क्रमप्राप्त आहे. म्हणून सर्व ग्राम अधिका-यांनी ठराविक
दिवशी प्रत्येक
ग्रामपंचायतीत जावून थेट ग्रामस्थांशी चर्चा करून प्रश्न समजावून
घेणे व जे
प्रश्न सुटण्यासारखे आहेत ते
सोडविण्याची प्रक्रिया सुरू करणेसाठी ग्रामस्थ दिन हा
अभिनव उपक्रम आयोजित करणेचे
निश्चित करणे आले आहे. |